Indian Banks Sector – आधीच्या काळी कर्ज वाईट किंवा कमीपणाचे लक्षण मानले जाई. लोकांमध्ये ‛चादर पाहून पाय पसरावे’ ही म्हण प्रचलित होती त्यामुळे आधीचे लोकं आहे त्या परिस्थितीत दिवस काढत असत. पण आता नवीन पिढी नवीन विचार आणि नवीन ट्रेंड! आता लोकं घरासाठी, कारसाठी, टू व्हीलर, मोबाईसाठी आणखी बऱ्याच गरजांसाठी सर्रास लोन म्हणजे कर्ज काढताना दिसत आहेत. त्यातच क्रेडिट कार्ड ही संकल्पना मध्यमवर्गीय लोकांमध्ये रुजली आहे त्यामुळे स्वतःच्या कुवती पेक्षा जास्त खर्च केले जाते.
आता चादर पाहून पाय पसारण्यापेक्षा लोकं कर्ज काढून चारदार मोठी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे लोकांमध्ये कर्ज घेण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. एका अवहालानुसार लोकांनी कर्ज काढण्याचा विक्रम केला आहे.
व्यक्तिगत लोक घेण्याचे प्रमाण वाढले (personal loans are increased)
लोकांमध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने कर्ज घेण्याऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. लोकं सोने गहान ठेवून आणि क्रेडीत कार्डच्या माध्यमातून सर्वाधिक कर्ज घेत आहेत. त्यामुळे भारतात कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रिजर्व्ह बँकेच्या आहवाला नुसार जुलै महिन्यात वैयक्तिक कर्जमध्ये 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे यासह कर्जाची रक्कम 55.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.सोन्यावर सर्वाधिक 39 टक्के कर्ज घेतले गेले, तर क्रेडिट कार्ड वापरून कर्ज घेण्याचे प्रमाण सोन्याच्या खालोखाल आहे.
एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरू शकतो?
एक व्यक्ती कितीही क्रेडिट कार्ड वापरू शकतो.त्याला कोणतेही लिमिटेशन नाही. पण कोणतीही Indian Banks तुम्हाला क्रेडीट कार्ड युश्यू करताना आधी तुमचे उत्पन्न तपासते तसेच तुमचा सीबील स्कोर कसा आहे ते ही पाहते. तुमचे उत्पन्न जास्त असेल आणि सीबील स्कोर चांगला असले तर तुम्हाला सहज क्रेडीत कार्ड मिळून जाते. काही लोकं तीन ते चार क्रेडिट कार्ड वापरतात पण ते वावरत असताना त्यांच्या लक्षात हे येत नाही की यामुळे त्यांचे उत्पन्न वाढणार नाही आणि त्यांची आर्थिक कुवत देखील वाढणार नाही. पण लोकं क्रेडिट कार्ड व्दारे खरेदी करत असताना हे विसरून जातात आणि वारेमाप खरेदी करतात आणि स्वतःवर कर्जाचा बोजा वाढवून घेतात.
आजकाल आपल्या जवळ क्रेडिट कार्ड असणे म्हणजे आपण श्रीमंत आहोत किंवा मग आपण अपडेटेड आहोत जगाच्या बरोबर चालतो असा विचार करून लोकं क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसतात.पण अशा वागण्यामुळे ते पुढे जाऊन अडचणीत येतात आणि मग कर्जबाजारी होतात
वाढली आहे क्रेडिट कार्डची थकबाकी
या अहवालानुसार एक धक्कादायक बाब पुढे आली आहे ती म्हणने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कर्जाची थकबाकी खूप वाढली आहे. म्हणजे लोकांनी क्रेडिट कार्डमधून थकबाकी वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून अंदाजे 2.8 लाख कोटी रुपये झाले आहे.
UPI व्यवहारात विक्रमी वाढ
आजकाल लोकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याचा कल वाढला आहे. म्हणजेच लोकं UPI व्यवहार करण्याला जास्त पसंती देत आहेत.या व्यवहारामुळे एक तर लोकांना स्वतःबरोबर पैसे घेऊन फिरण्याची गरज नाही त्यामुळे त्यांचे पैसे चोरीला जाणे किंवा हरवण्याचा प्रश्नच येत नाही.लोकांना पैशाचा UPI च्या माध्यमातून व्यवहार करणे सुरक्षित वाटत आहे.त्यामुळे ऑगस्ट महिन्यात UPI व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात UPI मध्ये विक्रमी 14.96अब्ज रुपयांचे व्यवहार झाले आहेत. म्हणजेच 41 टक्के इतकी वाढ झाली आहे. यासह एकूण व्यवहाराची 20.61 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 31 टक्क्यांनी अधिक आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. सलग चार महिन्यांपासून UPI व्यवहार 20 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहेत.
Indian Banks ही लोकांनी क्रेडिट कार्ड वापरावे म्हणून निरनिराळ्या ऑफर्स देत असतात. कधी कोणत्या मोबाईल खरेदीवर इतकी सूट तर कधी कोणत्या फ्रीज खरेदीवर इतकी सूट अशी प्रलोभने दाखवली जातात आणि लोकं त्यांच्या प्रलोभनां फसतात. पण याच Indian Banks क्रेडिट कार्डमधून कर्ज रुपात घेतलेल्या पैशाला अव्वाच्या सव्वा व्याजदर लावतात.आजकाल लोकांमध्ये गोल्ड लोन घेण्याची ही खूप क्रेज पाहायला मिळते. म्हणजे लोकं Indian Banks मध्ये स्वतःचे दागिने गहन ठेवून कर्ज काढू शकतात. म्हणजे मराठीत त्याला सोने तारण कर्ज म्हणतात.लोकं बँकेत जाऊन सोन्याच्या बदल्यात कर्ज काढतात पण त्यावर देखील चांगलाच व्याजदर आकारला जातो. म्हणजे काय सोने तारण रुपात बँकेत ठेवून देखील लोकांना व्याज तर भरावेच लागते. आणि Indian Banks हे व्याज सहज वसूल देखल करतात.
शेवटी काय तुम्ही क्रेडिट कार्ड वापरा किंवा सोन्याच्या बदल्यात कर्ज घ्या.कर्ज हे कर्जच असून तुम्हाला व्याज आणि मुद्दल फेडावीच लागणार.