लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर Waqf Board ने दावा ठोकल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. शेतकरी गेल्या अनेक पिढ्यांपासून ही जमीन कसत आहेत, त्यामुळे हा दावा अनपेक्षित असून धक्कादायक आहे. Waqf Board ने पाठवलेल्या नोटिसांमुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. “आमची जमीन Waqf Board कधीच नव्हती, मग आज अचानक हा दावा कसा?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
गावकऱ्यांचा विरोध आणि सरकारकडून अपेक्षा
तळेगाव हे 150 घरांचे गाव आहे, जिथे 75 टक्के जमीन वक्फ बोर्डाने स्वतःची असल्याचे म्हटले आहे. मात्र, इथले बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून शेती हीच त्यांची उपजीविकेची साधन आहे. वक्फ न्यायाधिकरणाने पुढील सुनावणीसाठी 20 डिसेंबर ही तारीख दिली असून, ग्रामस्थांनी सरकारकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “जर सरकारने आमच्या पाठीशी उभं राहिलं नाही, तर आम्ही मोठा लढा उभारू,” असे शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे.
also read – मुंबई चा धोका वाढला : air pollution समस्या आणि उपाय
Waqf Board कायद्यात सुधारणा आणि राजकीय प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर भाष्य करत Waqf Board च्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. केंद्र सरकारने प्रस्तावित सुधारणा केल्यास वक्फ बोर्डाचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल, तसेच त्यांच्या कारभारावर ऑडिट करण्यात येईल. “शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका आणि संसदेत सुधारित विधेयक मंजूर करून घ्या,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
जमिनीचा वाद आणि शेतकऱ्यांचे भविष्य
Board च्या दाव्यामुळे तळेगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लढण्याची तयारी दर्शवली आहे. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीचा दाखला देत राज ठाकरे यांनी Waqf Board नेही राष्ट्रीयतेचा आदर्श ठेवावा, असे म्हटले आहे. “आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.