Tollywood चित्रपट निर्माता शंकरा कृष्णा प्रसाद चौधरी, म्हणजेच k p chaudhary, यांनी गोव्यातील भाड्याच्या घरात आत्महत्या केली. ४४ वर्षीय चौधरी गेल्या काही महिन्यांपासून एकटे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मित्र फोन आणि मेसेजला प्रतिसाद न मिळाल्याने चिंतेत होते. त्यांनी घरमालकाला कळवले, त्यानंतर चौधरींनी गळफास घेतल्याचे उघड झाले.
इंजिनिअरिंगमधून चित्रपट निर्मितीपर्यंतचा प्रवास
k p chaudhary हे तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील बोनाकल गावचे रहिवासी होते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक पूर्ण केला होता. पुढे ते पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ऑपरेशन्स डायरेक्टर म्हणून कार्यरत होते.
चित्रपट निर्मितीच्या आवडीमुळे त्यांनी Tollywood मध्ये पाऊल टाकले. २०१६ मध्ये ‘कबाली‘ चित्रपटाची निर्मिती केली, ज्याने ६५० कोटींची कमाई केली होती. तसेच ‘सरदार गब्बर सिंग’ आणि ‘सीताम्मा वकित्लो सिरीमल्ले चेट्टू’ या चित्रपटांचे वितरण हक्क मिळवले होते.
also read- Ashok Saraf यांना पद्मश्री पुरस्कार
ड्रग्ज प्रकरणात अटक आणि व्यवसायातील अपयश
चित्रपट क्षेत्रातील कामकाजामुळे k p chaudhary अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले. याच काळात त्यांनी गोव्यात एक क्लब सुरू केला. मात्र, जून २०२३ मध्ये त्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली सायबराबाद पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा व्यवसाय तोट्यात गेला होता आणि त्यांनी एका नायजेरियन तस्कराकडून कोकेनच्या १०० पाउच खरेदी केल्या होत्या. यामुळेच त्यांना अटक करण्यात आली होती.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही
गेल्या काही महिन्यांपासून k p chaudhary मानसिक तणावात होते. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
also read- Shreyas talapade & Alok nath यांच्यावर स्कॅमप्रकरणी तक्रार दाखल
Tollywood मध्ये शोककळा (k p chaudhary suicide)
k p chaudhary यांच्या निधनाने Tollywood मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांनी तिकीटबारीवर यश मिळवले होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीत संताप आणि दु:खाचे वातावरण आहे.