२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री २५ वर्षांनी भारतात येताच झाली भावनिक, Mamta Kulkarni हिने आपली भावना केली सोशियल मेडियावर पोस्ट

Admin
4 Min Read
Mamta Kulkarni

Mamta Kulkarni 2024 comeback : हिंदी चित्रपटाची शान आणि ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी अभिनेत्री Mamta Kulkarni तब्बल २५ वर्षांनी मुंबईत परतली आहे. तिने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर करत आपल्या परतण्याची कहाणी सांगितली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाय ठेवताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, हे दृश्य तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं. विमानातून भारताकडे पाहताना आपल्याला आलेल्या भावना ती व्यक्त करताना म्हणाली, “ही मातृभूमीच आहे जी मला पुन्हा इथे खेचून घेऊन आली.” तिच्या या परतण्यामागे एका मोठ्या प्रवासाची कथा दडली आहे. 

Mamta Kulkarni गेली होती भारत सोडून   

२००० साली ममता कुलकर्णी ने भारत सोडला होता. अनेक वर्षं तिचं नाव अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात आलं होतं. ती आणि तिचा पती विकी गोस्वामी यांच्यावर गंभीर आरोप होते. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे तिचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झालं. मात्र, अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिच्यावर असलेले सर्व आरोप खोडून काढत तिला क्लीन चिट दिली. त्यामुळे ती निर्धास्तपणे आपल्या मायदेशी परत आली आहे. ममता म्हणते की, “मी २०१२ मध्ये कुंभमेळ्यासाठी भारतात आले होते, पण आता तब्बल २५ वर्षांनंतर माझ्या मुंबईत परत आले आहे.” 


aslo read – Pushpa 2: The Rule ने केला नवीन इतिहास: पहिल्या दिवशीचे रेकॉर्ड ब्रेक कमाई


ड्रग्ज प्रकरणाने करियर संपवले   

२०१५ च्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणामुळे ममता कुलकर्णी चे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले. तिच्यावर २००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात सामील असल्याचा आरोप झाला होता. यामुळे तिच्यावर मोठं संकट आलं आणि ती देश सोडून गेली. या सगळ्या परिस्थितीमुळे तिच्या करिअरला मोठा फटका बसला. मात्र, ममता कुलकर्णीने कधीही हार मानली नाही. कोर्टाच्या निर्णयाने तिला न्याय मिळाल्यानंतर, ती आज पुन्हा देशात परतली आहे. तिच्या या परतण्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे. 

- Advertisement -

Mamta Kulkarni करणार नवीन सुरुवात   

५२ वर्षांच्या ममता कुलकर्णी ने आपल्या कारकिर्दीत ‘करण अर्जुन’, ‘घातक’, ‘नसीब’, ‘सबसे बडा खिलाडी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. तिचं आयुष्य वादळांनी भरलेलं असलं, तरी आज ममता कुलकर्णी एक नवीन सुरुवात करण्यासाठी तयार आहे. आता ती जानेवारीच्या अखेरीस प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहे. मुंबईतील या पुनरागमनामुळे तिचं आयुष्य पुन्हा नव्या वाटेवर प्रवास करणार, असं वाटतंय. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 


FAQ

  1. Who is Mamta Kulkarni?

    Mamta Kulkarni is a popular Bollywood actress from the 90s, known for her roles in films like Karan Arjun  and Sabse Bada Khiladi. 

  2. Why did Mamta Kulkarni leave India?

    She left India in 2000 due to her involvement in a drug trafficking case, which caused her career to suffer. 

  3. What is Mamta Kulkarni doing now?

    Mamta has recently returned to Mumbai after being cleared of legal charges and plans to participate in the Kumbh Mela. 

  4. What was Mamta Kulkarni’s major controversy?

    Her name was linked to a 2000 crore drug trafficking case in 2015, along with her husband Vicky Goswami. 

  5. How is Mamta Kulkarni’s return significant?

    Her return marks a fresh start after a long legal battle, bringing closure to a controversial chapter in her life.   

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *