आता गरज नसल्यास नाही करायला लागणार data recharge, करा फक्त Voice recharge

Admin
3 Min Read
Voice recharge

Voice recharge Plan: भारतामध्ये मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी काही नवीन व्हॉईस आणि एसएमएस प्लॅन्स लाँच केले आहेत, जे विशेषत: ते लोक ज्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा हवी आहे, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये जिओ, एअरटेल आणि व्हीआय (वोडाफोन आयडिया) यांचा समावेश आहे.

Voice recharge आणि एसएमएस प्लॅन्स

तुम्हाला माहितच आहे की, आजकाल अनेक लोकांना घरात किंवा ऑफिसमध्ये वायफाय असतो आणि ते त्यावरच काम करतात. मोबाइल डाटा तुलनेत वायफायवर काम करणं जास्त सोपं आणि जलद असतं. त्यामुळे, डेटाचे जास्त रिचार्ज करण्याऐवजी लोक वायफाय वापरणे पसंत करतात. त्यामुळे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे फक्त व्हॉईस आणि एसएमएस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काही नवे Voice recharge प्लॅन्स उपलब्ध झाले आहेत. याचा मुख्य फायदा म्हणजे, जे लोक फक्त कॉलिंग आणि एसएमएस वापरतात, त्यांना डेटा प्लॅन घेण्याची गरज नाही.


also read – Realme 14 Pro 5G and Realme 14 Pro 5G + सरड्या प्रमाणे रंग बदलणार


Jio Voice recharge आणि एसएमएस प्लॅन:

जिओने दोन बजेट-फ्रेंडली व्हॉईस प्लॅन्स लाँच केले आहेत. 

- Advertisement -

1. Rs. 458 प्लॅन:

  •    – वैधता: ८४ दिवस 
  •    – सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग 
  •    – १००० मोफत एसएमएस 

2. Rs. 1959 प्लॅन:

  •    – वैधता: ३६५ दिवस (1 वर्ष) 
  •    – सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग 
  •    – ३६०० मोफत एसएमएस 

याद्वारे, जिओ ग्राहकांना मोठ्या रिचार्जच्या खर्चापासून वाचवता येईल.

Airtel Voice recharge आणि एसएमएस प्लॅन:

एअरटेलने देखील दोन व्हॉईस प्लॅन्स लाँच केले आहेत. 

1. Rs. 509 प्लॅन:

  •    – वैधता: ८४ दिवस 
  •    – सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग 
  •    – ९०० मोफत एसएमएस 

2. Rs. 1999 प्लॅन:

  •    – वैधता: ३६५ दिवस (1 वर्ष) 
  •    – सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग 
  •    – ३६०० मोफत एसएमएस 

यामध्ये एअरटेल ग्राहकांना दीर्घकालीन रिचार्जची सुविधा मिळते.

VI Voice recharge आणि एसएमएस प्लॅन:

व्हीआयने एकच व्हॉईस प्लॅन लाँच केला आहे. 

1. Rs. 1460 प्लॅन:

  •    – वैधता: २७० दिवस 
  •    – सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग    
  • – २७० दिवस १०० मोफत एसएमएस 

तुम्हाला फायदा कसा होईल?

या सर्व प्लॅन्सचा मुख्य उद्देश असं आहे की, जे लोक फक्त कॉलिंग आणि एसएमएस वापरतात आणि डेटा वापरण्याची आवश्यकता नाही, त्यांना Voice recharge प्लॅन्स फायदेशीर ठरू शकतात. त्यांना दर महिन्याला डेटा रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचे खर्च कमी होऊ शकतात.

म्हणजे, तुम्ही जास्त डाटा खर्च न करता फक्त कॉल आणि एसएमएससाठी रिचार्ज करू इच्छिता, तर या प्लॅन्समधून तुम्हाला उत्तम पर्याय मिळतील.

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *