थोर देशभक्त, उद्योग जगतातील एक अनमोल रत्न निखळले, Ratan Tata Death

Pratiksha Majgaonkar
6 Min Read
Ratan-Tata-Death

Ratan Tata Death:- बुधवारी रात्री प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज वरळीतील स्मशान भूमीवर दुपारी ३:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

देशभक्त, नफा तोटा न पाहणारा आणि देशसेवेला प्राधान्य देणारा एक उद्योगपती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. रतन टाटांच्या निधनाची (Ratan Tata Death) बातमी समजतात देशात एक शोककळा पसरली आहे. औद्योगिक क्षेत्रात ज्यांनी मोठं योगदान दिलं, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी वाहिले असे व्यक्तिमत्व हरपल्याने देशाची कधीच भरून न निघणारी हानी झाली आहे अश्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी अनेकांना आपलंस करून एक कुटुंब तयार केलं होतं. सगळ्याच देशवासीयांच्या मनात रतन टाटांच्या बद्दल आपुलकी होती आणि हेच छत्र आता हरपले आहे. नेहमी देशाचा पहिला विचार करणारे आणि अत्यंत साधे राहणीमान असलेले टाटा आता आपल्यातून निघून गेल्याने एक पोकळी निर्माण झाली आहे.

रतन टाटांच्या मृत्युमुळे उद्योग क्षेत्रासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून देखील हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर सरकारी इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असून राज्यात आज म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

रतन टाटांच्या दुःखत मृत्युमुळे आज जे शासकीय कार्यक्रम होणार होते सर्व रद्द करून उद्या म्हणजेच शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे मुंबईचे पालक मंत्री दीपक केसकर यांनी सांगितले. मोठमोठे दिग्गज आणि राजकीय नेत्यांकडून देखील हळहळ व्यक्त होत असून रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


TATA GROUP
TATA GROUP

राजकीय नेत्यांकडून टाटांना श्रद्धांजली (Ratan Tata Death)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करत म्हणले आहे, “आज दुर्मिळ रत्न हरपले. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा समुहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो (Ratan Tata Death) .”

“ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा ( Ratan Tata ) यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे. रतन टाटा जी एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण-आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा (Ratan Tata) यांच्यासोबत अनेकदा भेटीची, चर्चेची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात ‘व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’ची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’ची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली (Ratan Tata Death) अर्पण करतो. ॐ शांती” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.


https://www.youtube.com/watch?v=_sMmCQdOVAw&list=RDNS_sMmCQdOVAw&start_radio=1

अभिनय क्षेत्रातील दिग्गजांनी रतन टाटांना दिलेली श्रद्धांजली

“एखाद्याला निरोप देताना आपण सहज ‘टा-टा’ म्हणतो, पण ‘रतन टाटा’ सर, तुम्हाला सहज निरोप देता येत नाहीये. तुम्ही देशाला नुसतं फोनने नाहीतर, माणुसकीने जोडलंत, माणसांमधल्या कॅन्सरच्या तारा कापून, इलेक्ट्रिकच्या तारांनी देश जगवलात. तुम्ही बनवलेल्या गाड्या जर भारतातल्या रस्त्यावरून धाऊ शकतात, तर त्यातून आम्ही चंद्रावर सुद्धा सहज प्रवास करू अशी मला खात्री वाटते. भारताला सुजलाम सुफलाम म्हणतात ते तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळेच. ‘रतन टाटा’ सर तसा आपला वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही. लेकीन, मैने आपका नमक खाया है! आणि संबंधाचं म्हणाल तर ‘देवा’बरोबर ही माझा वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही, पण त्याचे अनंत उपकार कधीच विसरता येणार नाहीत आणि तुमचे सुद्धा…- कुशल बद्रिके

कुशल बद्रिके यांनी रतन टाटांच्या मृत्यूवर (Ratan Tata Death) अशी भावनिक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच लेखक क्षितिज पटवर्धन यांनीही पोस्ट शेअर करत असे लिहिले आहे की, “रतन टाटा सर… ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली. फक्त मालाची विक्री नाही, मूल्यांची बांधणी केली. पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला कीर्ती दिली. तुमच्या वैचारिक श्रीमंतीला आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला, आणि लखलखीत कारकिर्दीला… विनम्र अभिवादन”

रतन टाटांच्या मृत्यूचे कारण (Ratan Tata Death Reason)

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असल्याने तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजल्याच्या दरम्यान त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते आणि त्यावरच उपचार सुरू होते. कमी झालेल्या रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू (Ratan Tata Death) झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *