Big worry for India as Pakistan sends another cargo ship to Bangladesh
बांग्लादेशात सत्तापालट होताच तिथे एकापाठोपाठ एक भारत विरोधी कारवायांनी वेग पकडला आहे. बांग्लादेशात नरसंहार करणारा पाकिस्तान आज या देशाचा जवळचा मित्र बनला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारताविरोधात कारस्थान रचत असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, पाकिस्तानातून राजधानी ढाकाला एक जहाज आलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात RDX आणि AK47 रायफल्स असल्याची माहिती आहे. हा सर्व साठा बांग्लादेशात पोहोचला आहे.
कराची बंदरातून एमवी अल बखेरा हे पाकिस्तानी मालवाहू जहाज निघालं. त्यात 250 किलो RDX आणि 100 पेक्षा जास्त AK47 रायफल्स होत्या. चांदपूरच्या चटगांव बंदरात हे सर्व सामान पोहोचलय (second cargo ship from Pakistan at Chittagong Port) हे जहाज ढाका बंदरात येणं अपेक्षित होतं, पण ते चांदपूर बंदरावर गेलं. भारताच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर 720 टन गुराढोरांच खाणं होतं. पण मोठ्या प्रमाणात RDX आणि शस्त्रसाठा चटगांव पोर्टच्या एका सुरक्षित घरात उतरवण्यात आला आहे.
याच दरम्यान बांग्लादेशच्या चांदपूर येथील ईशानबाला कालव्यात उभ्या असलेल्या एमवी अल-बखेरा जहाजात 7 जणांची हत्या झाली. या प्रकरणात आकाश मंडल ऊर्फ इरफानला अटक करण्यात आली आहे. त्याला चांदपूरच्या कोर्टाने 7 दिवसांच रिमांड दिली आहे. रिवर पुलिस इंस्पेक्टर मोहम्मद कलाम खान यांनी 10 दिवसांची रिमांड मागितली होती. पण न्यायिक मजिस्ट्रेट मोहम्मद फरहान सादिक यांनी सात दिवसांची रिमांड मंजूर केली. या खटल्यात सरकारच्या बाजूने 3 वकील होते. पण आरोपीची बाजू मांडणारा एकही वकील नव्हता.
इरफानला मंगळवारी रात्री चितलमारी भागातून Rab-11 ने अटक केली. इरफानला पगार मिळाला नव्हता, तसच जहाजाचा मालक गोलाम किबिराकडून जी वागणूक मिळायची, त्यावर इरफान नाराज होता. त्याने रागात येऊन जहाजावरील सात जणांची हत्या केली. तटरक्षक दल आणि रिवर पोलिसांना सोमवारी जहाजात पाच मृतदेह सापडले. 3 जखमींना वाचवलं. जखमींपैकी दोघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
cargo ship from Pakistan at Chittagong Port
cargo ship from Pakistan at Chittagong Port